मुंबईची लाईफलाईन नेहमीच्या गमज्यात चालली होती. दुपारीची वेळ होती. खिडकीच्या बाजूला बसलेला आदित्य त्याच्या फोनवर नोट्स वाचत होता. ऑफिसच्या प्रोजेक्टचा ताण त्याच्या कपाळावर ठसठशीत रेषा काढून गेला होता. मुंबईत येऊन आदित्यला दोन वर्षे झाली होती. महानगराच्या वेगवान जीवनाशी अजून तडजोड सुरूच होती. एकटेपणा हा त्याचा जोडीदार होता.
आदित्य बोरिवली स्टेशनवर उतरला. स्टेशनवरून छोट्याशा फ्लॅटकडे चालत निघाला. रस्त्यावर गर्दी. हॉर्नचा कर्कश आवाज. दुकानांमधून येणारा विविध खाद्यपदार्थांचा वास... हे सगळं त्याला अजून परकंच वाटत होतं. चालता चालता तो नॅशनल पार्कजवळ पोहोचला. हळूच त्याचे पाय नॅशनल पार्कमध्ये वळले. तो तसाच पुढे चालत होता. तेवढ्यात त्याचे लक्ष एका कोरीव आकृतीकडे गेले. उद्यानातील एका बेंचवर एक तरुणी बसलेली होती. तिच्या हातात स्केचबुक होती. ती अत्यंत एकाग्रतेने काहीतरी रेखाटत होती. तिचे लांब केस वाऱ्यावर लहरत होते. नॅशनल पार्कमधील प्रकाशाने तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेजस्वी छटा निर्माण झाली होती.
आदित्य थांबला. काहीतरी अनोखं, काहीतरी मोहक दिसत होतं. ती मुलगी पेन्सिलीने स्केच रेखाटत होती. तेव्हा तिच्या चेहऱ्यावरची एकाग्रता, डोळ्यातील सर्जनशीलता जाणवत होती... हे सगळं बघून आदित्य विस्मयाने थक्क झाला. तो स्वत:ला विचार करू लागला, "हे काय आहे? असं तर मी आजपर्यंत कधीच अनुभवलं नाही. पाहिलं नाही. जणू काही माझं हृदयच थांबून गेलंय." ही भावना त्याला अपरिचित होती. तो पुढे चालत राहिला पण त्या मुलगीचे चित्र त्याच्या डोळ्यांमध्ये कोरलं गेल.
दुसऱ्या दिवसापासून नॅशनल पार्क आदित्यच्या दिनक्रमाचा एक भाग बनले. तो जाणूनबुजून त्या वेळी ऑफिसमधून निघे, जेणेकरून त्या बेंचकडे जाताना त्या कलाकार मुलीला बघू शकेल. कधी ती स्केच रेखाटत असे, तर कधी फक्त बसून झाडांना, ढगांना न्याहाळत असे. आदित्यला तिचं नावही माहिती नव्हतं, पण तिच्या उपस्थितीने त्याच्या एकाकी जीवनात एक नवीनच रंग भरला होता.
एके दिवशी तो बेंचजवळ पोहोचला. एवढ्यात थोडा जोराचा वारा आला. तिची स्केचबुक वाऱ्याने उडाली आणि ती एका झाडाच्या फांदीवर अडकली. ती मुलगी पाय उंच करून स्केचबुक काढण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला ते जमत नव्हतं. आदित्य झपझप पुढे आला. "मी काढून देऊ का?" म्हणत त्याने सहजतेने फांदीवरून स्केचबुक काढलं आणि तिला दिलं. तिने आदित्यकडे पाहिले. "ओह! खूप खूप धन्यवाद!" स्माईल देत ती म्हणाली.
"काही नाही. तुम्ही खूप सुंदर स्केच रेखाटता," तिच्या स्केचबुककडे बघत आदित्य म्हणाला. तिने एका वृद्धाचे अतिशय सूक्ष्म चित्र रेखाटलं होतं, ज्याच्या चेहऱ्यावर अनंत कथा कोरलेल्या दिसत होत्या.
"धन्यवाद. माझं नाव अनन्या आहे," ती हात पुढे करत म्हणाली. "मी आदित्य. तुम्ही इथं रोज येता का?" त्याने अन्यन्यला शेकहॅण्ड करता करता विचारले.
"होय. इथं शांतता वाटते आणि प्रकाशही छान असतो संध्याकाळी. स्केच रेखाटण्यासाठी परफेक्ट." अन्यन्या म्हणाली.
तेवढ्यात, एक फेरीवाला "चाय... गरमा गरम चाय..." असे ओरडत येताना दिसला.
आदित्यला एक कल्पना सुचली. "चहा पिऊ या का? मी म्हणजे..." तो थोडा अडखळतच बोलला.
अनन्यालाही हसू आलं. "हो, का बरं नाही?" ती म्हणाली.
अशा प्रकारे दोन कप गरम चहा घेऊन ते त्या बेंचवर बसले. दोघांमध्ये संभाषण सुरु झाले. आदित्यला कळले की, अनन्या एक फ्रीलांस इलस्ट्रेटर आहे, जी पुस्तकांसाठी चित्रे काढते. तिला तिच्या कलेबद्दल खूप ओढ होती आणि ती मुंबईतल्या छोट्याशा खोलीत राहून स्वत:चा मार्ग शोधत होती.
"मुंबईत एकटीने राहणं सोपं नाही, नाही का?" आदित्य म्हणाला.
"नाही, पण इथं स्वातंत्र्य आहे आणि इथली ऊर्जा, ही गडबड... यातूनच नवनवीन कल्पना जन्माला येतात," अनन्या म्हणाली. तिचे डोळे चमकत होते. डोळ्यांमध्ये तेज होते.
तिचं उत्तर ऐकून आदित्यला आश्चर्य वाटलं. जे जीवन त्याला ओझं वाटत होतं, तेच अनन्यासाठी सर्जनाचं स्रोत होतं. तो म्हणाला, "खरंय. मी कधी तसं बघितलंच नाही. माझं जीवन फक्त ऑफिस आणि घर यातच सिमटून गेलंय."
"मग तुला बदल हवा आहे, आदित्य," अनन्या म्हणाली, एका अर्थपूर्ण नजरेने त्याच्याकडे बघत अनन्या पुन्हा म्हणाली, "जग बघण्याचा दृष्टिकोन बदलला की सगळंच बदललेलं दिसतं."
तेवढ्यात, आकाशात ढग गोळा झाले आणि पाऊस सुरु झाला. "छत! माझं स्केचबुक!" अनन्या ओरडली.
दोघेही एका मोठ्या झाडाखाली आश्रयासाठी धावले. झाडाची फांदी एक छतासारखी होती. पावसाच्या धारा त्यांच्या आजूबाजूला कोसळत होत्या, पण आदित्य आणि अनन्या भिजत नव्हते.
"वाह, इथं छान आहे, जगातल्या सगळ्या गडबडीपासून दूर," आपले केस हलके कुरवाळत अनन्या म्हणाली.
आदित्य तिला बघत होता. अनन्याच्या केसांमधून पावसाच्या थेंबांचा सुगंध येत होता. तो म्हणाला, "खरंच. इथं जग वेगळंच दिसतंय."
तेवढ्यात, अनन्या हसली. "हे बघ, इंद्रधनुष्य!"
आदित्यने बघितलं. आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य उमटलं होतं. हा नजारा अप्रतिम होता. अनन्याने लगेच तिची स्केचबुक काढली आणि ते दृश्य रेखाटायला सुरुवात केली.
आदित्य तिला बघत राहिला. तिच्या हालचाली, तिची एकाग्रता... हे सगळं बघून त्याला जाणवलं की त्याच्या मनात काही तरी बदलत होतं आहे. तो म्हणाला, "अनन्या, मला काही तरी बोलायचं आहे..."
ती पेन्सिल थांबवून त्याच्याकडे बघत होती.
"मी तुला पहिल्यांदा त्या बेंचवर बघितलं तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो," आदित्य म्हणाला. "मला असं वाटलं की... देखा हैं पहिली बार, साजन ने आखों मे प्यार... जणू काही माझ्या आयुष्यातली सगळी रुंदी, सगळे रंग एकाच ठिकाणी एकवटलेत."
अनन्याचे गाल लाल झाले. ती हसली आणि म्हणाली, "आदित्य, हे खूप छान होतं."
"आणि मग," तो पुढे म्हणाला, "तेव्हा मला कळलं, की ये जिंदगी हमारी, बस इक पल की नही हैं... ये सदा के लिए हैं... हा क्षण, ही भावना, ही फक्त एक पल की नाही. हे कायमचं राहील."
पाऊस थांबला होता आणि सूर्याने पुन्हा दर्शन दिलं. अनन्या आदित्यच्या जवळ आली. "मला वाटतं," ती म्हणाली, "आपण दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलोय... आपल्या दोघांच्या हृदयांचा तार झंकारत आहे, प्रेमाने..."
तेवढ्यात, दूरवरून एक भजन मंडळीचा आवाज येऊ लागला. त्यांचा स्वर मधुर होता. "हो गया है इकरार... हां, हो गया है इकरार..."
हा आवाज संपूर्ण वातावरणात भरून राहिला होता. आदित्यने अनन्याचा हात हळूवारपणे धरला. "तू माझ्या जीवनात आलीस, माझं जग बदललं, अनन्या," तो म्हणाला, आणि हे फक्त क्षणभर नाही, हे कायमचं आहे."
अनन्याने त्याचा हात जोरात धरला. दोघांनाही हे जगा आणि जीवन सुंदर भासू लागलं. जीवनाचं मधुर संगीत ऐकू येऊ लागलं. ते झाडाखाली उभे राहिले, आणि इंद्रधनुष्याच्या छटा त्यांच्यावर पडत होत्या. त्यांच्या सभोवतालचं वातावरण जणू काही त्यांच्या प्रेमाने रंगून गेलं होतं. ते दोघंही एकमेकांच्या नजरेत नजर घालून पाहात होतं, अगदी एकरूप झाल्यासारखे.
त्यानंतरचे दिवस आदित्य आणि अनन्यासाठी एक नवीन जीवन सुरू झाले. आदित्यने अनन्यासोबत मुंबईच्या रस्त्यांवर फिरायला सुरुवात केली. तो तिला तिच्या स्केचिंग स्पॉट्सवर घेऊन जाऊ लागला. मरिन ड्राईव्ह, गेटवे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. अनन्याने आदित्यला शहरातील सुंदर गोष्टी बघायला शिकवल्या. एका कोपऱ्यात उगवलेला फुलांचं झाड, एका जुन्या इमारतीवरचं नक्षीकाम, रस्त्यावरच्या एका फेरीवाल्याच्या चेहऱ्यावरील हसू.
एके रात्री ते जुहू बीचवर बसले होते. समुद्रकिनाऱ्यावर चांदण्यांचा प्रकाश पडला होता. शांत वातावरणात लाटांचा आवाज वाऱ्यासारखा गुंज घालत होता.
"मी कधीच समुद्राचं इतकं सुंदर रूप पाहिलं नव्हतं," आदित्य म्हणाला.
"ते कदाचित तू माझ्यासोबत बघितल्यामुळं असेल," अनन्या म्हणाली आणि तिनं त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं.
"नक्कीच," तो म्हणाला. "तू मला शिकवलंस की जग बघण्यासाठी. हे सुंदर जग पाहण्यासाठी डोळे पुरेसे नाहीत, तर एक हृदयही हवं....सर्व काही साठवून ठेवण्यासाठी. ये जिंदगी हसीन है... हे खरं आहे."
अनन्या म्हणाली, "आणि तू मला शिकवलंस, की प्रेम केवळ भावनाच नसते तर तो एक करारही असतो. आपल्या दोघांच्या हृदयाचं मिलन..."
तेवढ्यात, दूरवरून कोणीतरी गिटार वाजवत होता आणि तोच गाण्याचा सूर गुंजत होता. "हो गया है इकरार... हां, हो गया है इकरार..."
हा सूर समुद्राच्या आवाजात विलीन झाला होता. आदित्यने अनन्याकडे पाहिलं. तिचे डोळे चांदण्यांसारखे चमकत होते. त्याने तिच्या हातात हात घातला आणि म्हणाला, "हे सगळं सुरुवातीपासूनच ठरवलं होतं, नाही का? त्या पहिल्या दिवशी, त्या उद्यानातल्या पहिल्या भेटीत."
"होय," अनन्या म्हणाली. फक्त आपल्याला ते कबूल करायला थोडं वेळ लागला."
ते समुद्रकिनाऱ्यावर चालत होते, त्यांच्या सावल्या एकरूप झाल्या. मुंबईची शहरी अंधारी रात्र आणि अथांग परसलेला समुद्र त्यांचं प्रेम एका सुंदर कथेप्रमाणे वाढत होतं.
अनन्याने त्याचा हात जोरात धरला. "काय विचार करतोयस?" तिने विचारले.
"मी विचार करतोय, तू माझीच आहेस कायमची" आदित्य म्हणाला.
"आणि तू माझ्यासाठी," अनन्या म्हणाली.
तेवढ्यात, आकाशात एक तारा कोसळला. अनन्या म्हणाली, 'वाह! शूटिंग स्टार! काही तरी इच्छा व्यक्त कर.'
आदित्यने डोळे मिटले. त्याने इच्छा केली की हा सुखद सहवास कायम राहावा. त्याने डोळे उघडले तेव्हा पाहतो, की अनन्या त्याच्याकडेच बघत होती.
"तू इच्छा व्यक्त केली का?" तिने विचारले.
"होय," तो म्हणाला. "पण मला वाटतं ती आधीच पूर्ण झाली आहे."
अन्यनाने स्माईल केलं. ते पुन्हा चालू लागले. समुद्राचा आवाज आणि दूरवरून येणारा गाण्याचा सूर त्यांच्या प्रेमकथेचा साऊंडट्रॅक बनला होता. "हो गया है इकरार..."
आदित्य आणि अन्यन्या आता एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती आणि अन्यन्या आदित्यच्या कवेत होती.

No comments:
Post a Comment